Saturday 17 December 2011

सहज अचानक


त्या दिवशी अचानक काही तरी घडले आणि मी अंतर्मुख झाले.

गोष्ट साधीच होती.

संध्याकाळी भरपूर ट्राफिकमध्ये मी माझी दुचाकी गाडी चालवत ऑफिसकडून घराकडे निघाले होते.  चेहेऱ्यावर स्कार्फ बांधला होता त्या मुळे फक्त डोळे उघडे होते.

सिग्नलला थांबले होते तेव्हा समोर पहिले, कि समोरच्या दुचाकीच्या मागल्या सीटवर एक सुंदर बाई बसली होती आणि तिच्या मांडीवर तशीच सुरेख डोळे असलेली ४ - ५ वर्षांची मुलगी बसली होती.

थंडीमुळे आईने मुलीला शालीत गुंडाळले होते आणि त्या मुलीचे फक्त बोलके डोळेच दिसत होते.

मधेच शाल घसरली कि तिचा निरागस, सुंदर चेहेरा दिसायचा. मग ती परत शाल सारखी करायची. आणि परत तिचे फक्त डोळे दिसायचे.

मी तिचे निरीक्षण करते आहे हे लक्षात येताच ती हसली. तिचे ते निरागस हसू तिच्या डोळ्यात मला दिसले आणि मी पण चेहेरा झाकला होता तरी पण फक्त डोळ्याच्या हालचाली करून हसले.  मग डोळे वटारून बघितले आणि अचानक डोळे मिचकावले.

ती मुलगी क्षणांत माझ्याशी डोळ्यांच्या भाषेत खेळायला, बोलायला लागली.

१ मिनिट पण चालला नसेल हा खेळ.

सिग्नल हिरवा झाला आणि ती पुढे जाऊ लागली. जाता जाता प्रसन्नपणे शाल खाली करून आणि हात हलवत "टाटा" करून गेली. तिची आई पण आमचा हा २ क्षणांचा खेळ पाहून प्रसन्नपणे हसली.

मला खूप बरे वाटले. ट्राफिकचा ताण कुठल्याकुठे पळून गेला.

आणि अचानक...

अचानक मला त्या दिवशीची सकाळ आठवली.

थंडीमुले अलार्म कधी वाजला हे कळले नाही आणि कळले तेव्हा दुसरा अलार्म वाजत होता - मुलाला उठवण्याचा.

मी धडपडत उठले. २० मिनिटे उशीर झाला होता. मी भराभर आवरत होते. मुलाचा डबा  भरून ठेवला आणि शेवटली पोळी तव्यावर होती.

मुलगा हॉलमध्ये दूध पीत बसला होता. मी सैपाकघरातून हाक मारून त्याला डबा घेऊन जायला सांगितले. 

दुधाचा ग्लास हातात घेऊन तो उठला. एखादा घोट दूध उरले असेल. आणि खुर्चीला मीच अडकवलेल्या पर्सला अडखळून त्याच्या हातातला दुधाचा ग्लास खाली पडला. घोटभर दूध सांडले.

त्या आवाजाने मी दचकले आणि गरम पोळीच्या वाफेनी हात भाजला.

हे एवढे निमित्त झाले आणि किती दूध सांडले हे न बघताच मी जोरात मुलाच्या अंगावर ओरडले.

"सांडलेस ना दूध? एक तर घाई आहे आणि तू माझी कामे वाढव. हजार वेळा सांगितले आहे कि आधी दूध संपवत जा. कपडे खराब केले आहेत का? आणि हे दूध गरम आहे. गार करायला आता वेळ लागेल. बाकी सगळे आवरून तयार राहा. मी गार करते आहे हे दूध."

नवऱ्याला पण ओरडूनच सांगितले " आरे आता तू बघ हे. मला उशीर झाला आहे. बस गेली तर त्या भयानक ट्राफिक मध्ये मला गाडी घेऊन जावे लागेल."

एवढे ओरडून झाले आणि मग माझ्या लक्षात आले कि दूध पिऊन झाले होते आणि फक्त घोटभर दूध सांडले होते. मुलाने फडके आणून दिले होते आणि त्याचा बाबा साफ करत होता.

सकाळी सकाळी चूक नसताना मी ओरडले म्हणून मुलगा हिरमुसला होता आणि नवरा चिडला होता.

घड्याळ बघितले आणि लक्षात आले कि आता कितीही आरडा ओरडा केला तरी बस मिळणार नव्हती. मी गाडीची किल्ली घेऊन निमूट बाहेर पडले.

नवरा आजून रागावलेलाच होता आणि मुलगा शाळेत निघून गेला होता.

संध्याकाळच्या गर्दीत मला हि घटना आठवली आणि मला त्या हसऱ्या मुलीच्या जागी मला माझ्या मुलाचा हिरमुसलेला चेहेरा दिसू लागला. आणि मग विचारांचे चक्र सुरु झाले.

असे का होते कि कधीकधी आपण परक्यांना सहज आनंद देऊन जातो. २ क्षण का होईना पण स्वतः पण तो आनंद अनुभवतो.  त्याचा गर्व वाटतो कि दुसऱ्याला मी असा आनंद दिला.  पण आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेकवेळा आपल्या अगदी जवळच्या माणसांचा अपमान करून बसतो, त्यांना दुखावून बसतो.

आपल्या चुकीचा राग दुसऱ्यावर काढतो आणि आपल्याच माणसांना गृहीत धरतो.

समोर ७५ सेकंदांचा सिग्नल लागला होता आणि ना राहवून मी गाडी बाजूला घेतली आणि मोबाईल काढला.

घरी मुलानेच फोन उचलला. मी सांगितले कि ट्राफिक जास्त आहे म्हणून थोडा उशीर होतो आहे पण १५ मिनिटात पोचेन घरी. पटकन तो म्हणाला " आई तू घरी आली कि मला माझा प्रोजेक्ट करायला मदत करशील का? खूप मस्त प्रोजेक्ट आहे."

तो उत्साहाने बोलत होता. सकाळच्या रागावण्याचा राग कुठेच नव्हता.

आणि मी विचार करू लागले कि आपण मोठी माणसे कशी वागतो? कधी कधी किती वाईट वागतो?

एखाद्यानी - एखाद्यानी कशाला - आपल्या जवळच्या माणसांनी जरी काही अपमान केला, आपल्या मना विरुध्ध वागले, तरी आपला "इगो" किती दुखावतो?  आपण तो राग किती तरी दिवस मनात धरून ठेवतो. किती तरी दिवस , किती तरी वर्ष आणि कधी कधी संबंध तोडून टाकायला पण मागेपुढे पाहत नाही.

आणि लहान मुलांना - आपल्याच लहान मुलांना मात्र ती लहान असल्याचा फायदा घेऊन अपमानित करतो तेव्हा  असा विचार तरी करतो का कि लहान मुलांना पण मान असतो आणि तो आपणच जपायला हवा?

मुले निरागसपणे सगळे विसरून आपल्याला माफ करून टाकतात पण आपण तो सहजपणा, ती माफ करण्याची वृत्ती मात्र लहानपणा बरोबर मागे टाकून देतो.

त्या दिवशी मी ठरवले कि मुलाने ज्या प्रमाणे मला माफ करून टाकले तसे मनात "इगो" ना ठेवता समोरचा चुकतो आहे असे स्वतःला वाटले तरी त्याला माफ करून टाकायचे. आणि स्वतःची चूक आहे असे वाटले तर सरळ माफी मागून मन मोकळे करून घ्यायचे.

ट्राफिक मधून वाट काढत घरी आले.

हॉल मध्ये बाबा आणि मुलगा प्रोजेक्टचा पसारा करून बसले होते.

मला बघताच मुलगा  प्रोजेक्टविषयी काहीतरी खूप उत्साहाने बोलायला लागला.

नवरा आजून रागावलेला दिसत होता. तो पण "मोठा" माणूस आहे ना! लहान मुल नाही.

हळूच मी दोघांना "सॉरी" म्हटले आणि आणि आत जाता जाता मागे वळून पहिले तर नवऱ्याचे डोळे सांगत होते कि त्यांनी पण मला माफ केले आहे.

माझ्या मनावरचा ताण नाहीसा झाला.

आयुष्य पुन्हा सुंदर वाटायला लागले.

आयुष्य सुंदर आहे आणि थोडे आहे.  आपण थोडेसे बदलून त्याला आणखीन सुंदर करायला हवे.

नाही का?





ता.क. - नाही का? चे अपेक्षित उत्तर, हो ना असे असते J

Wednesday 5 October 2011

Telephone Maa

8.30 AM  - Thursday.
The phone rings.
He picks up the phone.

Maa: "Hi, how are you? When did you wake up?"
He: "Hi Maa, I woke up some time ago"
Maa: "OK. So are you fresh now?"
He: "Yes. I have finished my breakfast and I want to play something. Tell me Maa, what should I play? I want some new activity today".
Maa: "Why don't you read the new book that we purchased last weekend? Try to draw something from it. Or you can play the keyboard."
He: "No, I don't want to play keyboard and I don't want to draw anything right now. I want to play something new.. Tell me Maa what should I play?
Maa: "OK. Do one thing. Play Hide and Seek with your Big Foot Ball. You throw the ball with your eyes closed. Don't throw on the cup boards. Then try to find it."
He: "Yeeeh, this is a new kind of hide and seek. OK Bye Maa, I will call you latter".

The phone goes dead.

11.08 AM
The phone rings and she picks up the phone.
He: "Maa, The foot ball is gone somewhere. He is not coming out to play with me. Tell him to come out Maa. Didi is also not able to bring him back."
Maa: "Give the phone to didi."
Didi(the house help): "Baai that ball fell down from the window. Baba had shut down his eyes so he could not see it and now he does not want to believe it."
Maa: " aree then go down and get the ball"
Didi: "But baai some children on the road took the ball and went away".
Maa: "ok. give the phone to baba."
He: "Maa what should I do now?"
Maa: "Beta the ball got bored so he went away. We will get a new ball today when I come home. Why don't you play with the small ball? But don't throw him, otherwise he will also go away. You and didi play catch-catch with him. So he will always remain with you."
He: "Ok. I will play with my small ball. But you come early today and get a new big ball for me. Bye Maaaaa."
The phone goes dead.

01.45 PM
The phone rings again.
Didi: "hello".
Maa: "what's up? where is he?"
Didi: "He is sleeping".
Maa "Had his lunch? was he playing with the small ball or was he getting bored?"
Didi: "He was playing with the small ball. But that also went out of the window. We went down and got it. But then he got bored
with it and watched TV for sometime and after having lunch he is sleeping now."
Maa: "OK. Let him sleep. After he wakes up, take him to the garden in the evening. Take care."

The phone goes dead.

4.40 PM
The Phone Rings.
He Picks up the phone.
He: Hello !
Maa: Hi Beta! How are you?
He: I am good Maa. I am drinking milk.
Maa: Good! You will become strong when you finish the milk. Good Boy!
He: Maa can I go downstairs to play when I finish milk?
Maa: Ok. But take care.
He: OK Maa. Bye Maaa! I am going down. Didiiii. Come on. Let's go down!
The phone goes dead.

7.00 PM
The phone rings again.
She disconnects the phone.
She is in a meeting.
7.01 PM
The phone rings again.
She disconnects the phone. She is still in a meeting.
7.01:30 PM
The phone rings again.
She disconnects the phone. She is still in a meeting.
7.05 PM
The phone rings again.
She picks up the phone.
Maa: Hello beta. I am busy I will call you in some time. Do not call me again. Bye.
He: OK Maa.

The phone goes dead.

7.20 PM
The phone rings again.
He picks up the phone.
He: Hello Maa.
She: Hello Beta. I was in a meeting so I could not talk. Tell me what's up!
He: Maa do not forget to get a new ball for me. A biiiig one!
Maa: Oh.. Ok I will try to get one.
He: Noooo. No try. I want the big ball. Like The one I that went somewhere. I want a big, Red new ball. I want it now.
She: You are a good Boy beta. See I have to stay late in the office. How can I get a new ball today!. We will go to a big mall on Saturday and we will get a ball for you then.
He: No. No. No. I want it today otherwise I am not going to speak to you.
Maa: OK I will try. But If I can  not get it today, I will get something else for you. Tell me what else do you want?
He: I want the ball and want a ....a.....a..... new Bat!
Maa: oh.. ok ok ok . See,  I have some work so I will call you when I am ready to leave from here. Please do not call me. Wait for my call. I will call you . Ok?
He: Ok Maa.
Maa: And have your dinner on time.
He: Ok Maa.
Maa: Ok Bye... You are a good Boy. I love you beta!
He: Bye Maa.  I also love you. Come soon Maa! And Get the Big Red Ball Maa.

The phone goes dead.

10:20 PM
The bell rings. Didi opens the door. Maa asks her without speaking anything where is he?
Didi: He is asleep!
Maa: oh.. Poor lad. I have got this new red big ball for him! Is he ok?
Didi: Yes.
Maa: you both had dinner?
Didi: Yes.
Maa goes to the bed room. Looks at the sleeping 3 years old child. Puts the big red plastic ball at the side table.
Softly kisses on his soft pink cheek and he says - ball come on , come on - we will play.
She smiles and switches off the light.

Tomorrow is going to be another busy week day.

Another day to attend important meetings in the office.

Another day to finish presentations.

Another day to handle difficult clients.

Another day to chat on IM with husband who is away on a project for some months.

And Another day to play the role of a "Telephone Maa".

Tuesday 13 September 2011

स्त्री-भ्रूण हत्या

तुम्हाला कोणते चित्र आवडेल?


 
















स्त्री-भ्रूण हत्या थांबवा.

स्त्रियांवरचे अत्याचार थांबवा.

कदाचित स्त्री-भ्रूण हत्या थांबायला त्यानेच मदत मिळेल.
 

Sunday 11 September 2011

जननी


मैं वसुंधरा मैं पृथ्वी, मैं जननी जन्मदायिनी हूँ,
सदियोंसे जी रही हूँ , मैं नारी जगद्धारिणी हूँ|

मैं हृदयमें बसती हूँ, मैं मीरा और शामप्रिया,
प्रेमसे जो जीते उसकी, मैं ह्रदयसम्राज्ञी हूँ|

माता हूँ, पुत्री हूँ, कोमल पुष्प कभी वज्रभी हूँ,
जन्मजन्मान्तर तक की, मैं सहधर्मचारिणी हूँ|

यशोधरा हूँ, उर्मिला हूँ, कामदेवकी रति हूँ मैं,
प्रिय अगर न पास हो, तो सदा विरहिणी हूँ|

हूँ लक्ष्मी और सरस्वती, चंडी और महाकाली हूँ,
एक क्षणमें अबला, तो क्षणमें शास्त्रधारिणी हूँ|

कभी गंगा, कभी पार्वति, कभी कहलाती दुर्गा,
दुष्टोंका संहार करूँ, मैं महिषासूरमर्दिनी हूँ|

कभी बनी मैं वसंतसेना , 'काली'दासकी शकुंतला,
समुद्रमंथन से निकली, मैं आज भी मोहिनी हूँ|

मैं अग्निजन्मा हूँ, और पृथा हूँ सदियोंसे,
हूँ शापित अहिल्या, फिरभी मैं स्वयं वरदायिनी हूँ|

मैं त्रिलोक की देवी, ब्रह्माण्डकी सम्राज्ञी हूँ,
मैं वसुंधरा, मैं पृथ्वी, मैं जननी जन्मदायिनी हूँ|
 
 
१७/०३/१९९६
बिलिमोरा  
 

Wednesday 10 August 2011

गणेशोत्सव

आला आला गणेशोत्सव आला! बाप रे!


लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले.प्रश्न हा आहे कि आज इतक्या वर्षानंतर आपण गणेशोत्सवाचे जे स्वरूप पाहतो आहोत ते खरोखरच योग्य आहे का? आपण एक सुसंस्कृत प्रजा म्हणून,जे चालू आहे ते तसेच चालू राहू द्यायचे आहे का? आजच्या परिस्थितीची काही उदाहरणे घेऊया.-हि यादी खूप मोठी होऊ शकते - पण तरी...

वर्गणी घेण्या पासून  त्याची सुरुवात होते. वर्गणी आता काही ठिकाणी प्रोटेक्शन मनी झाली आहे. मंडप, मूर्ती, देखावे वगेरे साठी खर्च होणारच. पण मंडपां मागे पडलेल्या बाटल्यांवर आणि कान फाडून टाकतील अश्या मोठ्या आवाजात वाजणाऱ्या (बरेचदा बीभत्स) अश्या गाण्यांवर पण हे पैसे खर्च होतात ना!

ह्या १० दिवसात रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते,प्रदूषण वाढते,रस्त्यांची दुर्दशा होते, विजेचा अपव्यय होतो आणि गणेशोत्सव सुरु झाल्या पासून ते विसर्जना पर्यंत पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेवर अतिशय ताण येतो.आणि विसर्जन झाले कि काय बघतो आपण? तलाव, नदी, नाले, समुद्र, विहिरी - पाण्याचे जे जे म्हणून स्रोत आहेत ते सगळे प्रदूषित झालेले असतात.

रस्ते खराब आहेत म्हणून महापालिकेला शिव्या देतो आपण.पण जेव्हा महापालिकेचे पाणीवाले , वीजवाले , फोनवाले  रस्ते खणून शांत होतात तेव्हा काय होते? तेव्हा गणेशोत्सव येतो,नंतर नवरात्री सुरु होतात आणि आपणच आधीच खराब असलेले किंवा आताच ठीक केलेले रस्ते मंडप लावण्या साठी परत खणून ठेवतो.म्हणजे पुन्हा महापालिकेला नावे ठेवायला आपण तयार!

एक जर्मन बेकरी कांड झाले कि थोडे दिवस आपली झोप उडते!
पण आपल्याला जेव्हा उत्सव साजरे करायचे असतात तेव्हा मात्र आपण पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेवर आपला आतोनात भार टाकून मोकळे होतो.उत्सव साजरे करणे हा तर आपला जन्मसिद्ध अधिकार आहे! स्वतंत्र भारतात!

शेजारच्या घरात मोठ्याने रेडिओ, टी.व्ही. जरी वाजत असेल तरी आपल्याला त्रास होतो.पण मोठमोठ्या डॉल्बीच्या भिंती उभारून जर आपण गाणी नाही बडवली तर कसे चालेल? ध्वनी प्रदूषण? हे काय असते आम्हाला माहित नाही आणि आम्हाला आमच्या शक्ती आणि भक्ती चे प्रदर्शन करायचे आहे हे का विसरता?

शहर घाण आहे, कचरा साठतो आहे म्हणून आपण ओरडतो. पण आपल्या भक्तीच्या महापूर मध्ये नदी,नाले,तलाव,समुद्र वगेरे जे पाण्याचे स्रोत आहेत ते सगळे प्रदूषित करायला आपण मागे पुढे पाहत नाही.निर्माल्य कलशात विसर्जित करणे म्हणजे काय?

आगदीच आधुनिकपण झाला!

आपण तर खूप धार्मिक आणि परंपरावादी आहोत!आणि हे असले कलश पुरणार तरी किती? आणि शेवटी ते कालाशातले निर्माल्य पण जाणार तर नदीमध्येच न? मग जाऊ दे - आपणच ते टाकूया नदीत!

विसर्जनाच्या वेळी २ - २ दिवस वाहतूक व्यवस्थेची "वाट" लागते. हि व्यवस्था कशी आहे हे वेगळे सांगायला नकोच!
पण आपल्या धार्मिक भावनेचा -कि राजकीय वर्चस्वाचा? - प्रश्न आहे ना! मग मिरवणूक जोरात नको का व्हायला?जितकी जास्त वाहतूक कोंडी तितके आम्ही जास्त शक्तिशाली!

आणि हे प्रश्न? हे प्रश्न आपण म्हणजे प्रजा जाऊ देतो पाण्यात - त्या गणराया बरोबर!

उपाय आहे का ह्याला काही? उपाय असला तरी इच्छा आहे का? विचार करायला वेळ आहे का? आणि काही करायला ताकद आहे का?

माझ्या मते काही उपाय आहेत -पण ते राबवायची माझ्यात नाही शक्ती न Authority! म्हणून फक्त विचार मांडायचे! मन मोकळे तरी होते!

प्रत्येक रस्त्यावर किती गणपति बसतिल् ह्या वर काहि निर्बन्ध असला पाहिजे.
एका रस्त्यावर दोन मंडपांमध्ये २ kilometer  चे  अंतर  हवे  असे  काही तरी ठरवले तर  मंडपांची  संख्या  कमी होईल.

डॉल्बी आणि इतर मोठा आवाज असणारी sound system वापरण्या वर बंदी असली पाहिजे. ती असेल कदाचित - पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.

रात्री १० नंतर आवाज बंद न केल्यास जागेवरच दंड आणि शिक्षेची सोय झाली पाहिजे.

जी मंडळे मंडप उभारणी साठी रस्ते खराब करतील, जिथे दारूच्या बाटल्या सापडतील त्या मंडळांवर बंदी घालावी.

ह्या सगळ्या साठी पोलीस आणि स्वयंसेवी संस्था दोघे जागेवर असल्या पाहिजे. हवे तर फिरते न्यायालय ठेवावे ज्या मुळे जिथल्या तिथे न्याय होईल आणि "तारीख पे तारीख" होणार नाही. "हा सूर्य आणि हा जयद्रथ"  असा न्याय पाहिजे.

घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी काही जागा ठरवून विसर्जनासाठी काही शुल्क ठेवावे.

सार्वजनिक मंडळाला परवानगी देताना विसर्जनासाठी किती माणसे जाणार आहेत त्या प्रमाणे स-शुल्क पास द्यावेत. विना परवानगी मंडळांना दंड आणि शिक्षा करावी.

मंडळाच्या विस्ताराप्रमाणे किती माणसे विसर्जनाला जाऊ शकतील ह्या वर निर्बंध घालावेत.  उदाहरणार्थ - मानाच्या गणपतीच्या विसर्जनाला २००० माणसे, मोठ्या मंडळाच्या बरोबर १०००, मध्यम मंडळांबरोबर ५०० वगेरे.

एका हद्दी नंतर फक्त पास असेल त्या लोकांनाच विसर्जनासाठी जाऊ द्यावे.

ह्या शिवाय ज्यांना विसर्जन बघायचे असेल त्यांना स-शुल्क पास द्यावे. आणि सगळ्या पासची संख्या लिमिटेड असावी. म्हणजे त्या पेक्षा जास्त लोक विसर्जनाच्या वेळी जमणार नाहीत.

 रस्ते बंद असतील तेव्हा  विसर्जनाची वेळ ठरवून द्यावी आणि त्या पेक्षा उशीर केल्यास दंड करावा. पण माणसे कमी असतील तर सगळे वेळेत संपण्याची शक्यता जास्त आहे.

विसर्जनाचे "Live" प्रसारण "CCTV" चा उपयोग करून ठिकठिकाणी मोठ्या स्क्रीन वर करावे. ह्याचा उपयोग सुरक्षे साठी पण होईल. ह्या स्क्रीन  साठी प्रायोजक शोधले तर हा खर्च महापालिकेच्या किंवा पोलिसांच्या डोक्यावर पडणार नाही.
पास, स्पोन्सरशिप, दंड वगेरे मधून गोळा झालेले पैसे गणेशमंडळाच्या सदस्यांची  एक समिती बनवून त्यांना द्यावे आणि त्या पैश्यांचा उपयोग सार्वजनिक विकासाच्या कामासाठी करावा.

करण्या सारखे खूप आहे.

निर्माल्य आणि मूर्तीची योग्य ती व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहांची बांधणी आणि देखभाल, पिण्याच्या पाण्याची सोय, सरकारी शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना मदत, सरकारी हॉस्पिटल्स मध्ये गरीब रुग्णांना मदत.

 हे अश्या साठी कि सरकारनी कितीही केले तरी समाजाची पण काही जवाबदारी लागते आणि कितीही चांगले सरकार असेल तरी (असेल तर!) करण्या सारखे खूप असते.

पण फक्त ह्या पैश्याची जवाबदारी महापालिके कडे नको. ती असली पाहिजे N G O कडे. म्हणजे त्याच्या सादुपायोगाची काही तरी खात्री राहील. नाही तर आज पर्यंत जसा विकास झाला आहे शहराचा (!) तसा ह्या पैश्यांनी पण होईल!

पण असा बदल करायचा आपण विचार तरी करणार का?

कारण आपण आता  स्वतंत्र आहोत! त्या मुळे आपल्या स्वातंत्र्यावर बंधने येतील असा कोणता पण निर्णय आपल्याला नको असतो!

आपल्या राजकारण्यांना, महापालिकेला, सुरक्षा यंत्रणेला नावे ठेवायला आपण नेहेमी तयार असतो -कारण तसे करायला काही कष्ट पडत नाहीत.

पण आपण किती बेजवाबदार, बेफाम वागतो ह्याचा कधी आपण विचार करतो का?

आपण म्हणजे प्रजा कधी बदलणार का?


Thanks  & Regards
Sony

Saturday 30 July 2011

First Day

Hi,

This is my first Blog Post and I am not sure for how many days I will be able to continue this.

Sometimes it so happens that we wish that we could speak to someone, share some time with someone and there is no one around.

Sometimes there are many people around but we do not feel like connecting to anyone.

So I thik - this thing - this blog is useful to express the thoughts as and when I need to express. Not to any one specific but for every one who is interested in it.

Thanks & Regards,

Sony

P.S: this one is just to check how it looks :)


Followers